अविनाश पोहरे ब्युरो चिफ, अकोला
अकोला – दि.१५/०३/२०२४ मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती अनुसूचित जाती, जमाती पेक्षाही मागासलेली आहे, असे सच्चर कमिशनने अधोरेखित केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी शासनाने कृतीशील पाउल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या बार्टी,सारथी, महाज्योती या स्वायत्त संस्था प्रमाणेच स्वायत्त संस्था स्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन, अकोल्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष इंजि.धिरज इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, अनिकेत शिरसाट, सह- प्रसिद्धीप्रमुख अंकित उल्हास इंगळे, सहसंघटक ऋषिकेश इंगळे, सह सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंदर, सचिव राहुल खाडे, जिल्हा सदस्य अंकित इंगळे, कुशल इंगळे, भूषण शिरसाट, दीपेश वानखडे, सैय्यद जिशान आदि पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.