सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड. जय हिंद सेवाभावी संस्थेच्या वतीने यावर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सत्तर इनामदार यांनी दिली आहे.गट 27 वर्षापासून जय हिंद संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यादीमध्ये राजू गायकवाड (नागपूर) सारिका गाखरे (वर्धा )डॉ.मनोज डायगव्हाणे (नागपूर) मनोज कुंभेजकर( मुंबई )सुनील चोरडिया( पुणे )डॉ.रवी वानखेडे (नागपूर )प्रो फराह खान( ठाणे) विनय राजे (नागपूर) इंद्रजीत लोणारे (नागपूर )किरण फुलझेल (नागपूर )डॉ.गाझी असर (उमरखेड )उज्वला पिंगळे (पुणे )सुनील खराटे (अमरावती )श्रद्धा शिंदे (मुंबई ) प्रा.शार्गीद अहमद अ.गफूर (उस्मानाबाद )प्राचार्य सलीम मो. हाजी आलंद (लातूर) शफी पठाण (नागपूर ) डॉ. जयदीप कोपरेकर (हिंगोली ) सुभाष जोशी (परभणी ) बालाजी बुधवंत (परभणी ) प्रा.वकील शेख( गडचिरोली ) अनिता वसराम (नागपूर )प्राचार्य वैभव बोंद्रे (सोलापूर) राजेश तलमले (भंडारा ) कॅप्टन सय्यद मोईन (परभणी)किशोर वाघुले औरंगाबाद प्राचार्य अजमल शहा अब्दुल्ला (जळगाव ) साईनाथ पुयड (परभणी ) सरफराज शेख (परभणी ) अनंतराव कोरडे (जिंतूर) सायली चव्हाण (अकोला) शाकीर जाफर (पुणे ) यांचा समावेश आहे. वर्धा येथे 27 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)