मंगेश थोरात
ब्युरो चीफ मुंबई
केडीएमसी चा रिंगरुट बाह्यवळण रोडमध्ये ८४५ घर बाधीत होत असल्यामुळे बर्याच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. हा रिंगरुट प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री शंभुराजे देसाई साहेब व खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे सहकार्याने प्रस्तावास मंजुरी मिळाली. तसेच केडीएमसी आयुक्त डॉ दांगडेसाहेब व सिटी इंजिनियर श्री अहीरे साहेब यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले
तसेच-अटाळी आंबिवली येथील रिंगरुट रोड घर बाधीत रहिवाशांचे शिष्ठमंडळ मधील , शिवसेना विभाग प्रमुख ऐरोली श्री.चंद्रकांत चाळके, विटावा शिवसेना शाखाप्रमुख श्री.तानाजी कोळेकर, शिवसेना ठाणे जिल्ह्य प्रमुख श्री.गोपाल लांडगे साहेब व पाटण तालुका सामाजिक कार्यकर्ते श्री महाडिकसाहेब, संजय गायकवाड, मारुती पाटील, रविंद्र कांबळे, ऐंथोनी पचेको, सचिन पवार, सुरेंद्र शेजवळ, सूर्यनारायण शाहु , संदिप घाडगे, विलास विनकरकाका, शशीकांत कोळेकर, निर्मलाताई गायकवाड व सर्व रिंगरुट बाधित रहिवाशी यांच्या सहकार्याने सदर पुनर्वसन प्रस्तावाचा पाठपुरावा शिष्टमंडळनी केला व त्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली
त्या बद्दल सर्व रिंगरुट बाधित रहिवाशी यांच्या तर्फे महाराष्ट्र सरकारचे व केडीएमसीचे मानले आभार १९९६च्या केडीएमसी च्या पुनर्वसन धोरणानुसार रिंगरुट मध्ये रहिवाशी बेघर होत होते तर त्याच्या मध्ये बदल करुन ती पुनर्वसन ग्राह्यता दिनांक :-०३/१२/२०२० निश्चित करुन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केडीएमसी च्या प्रस्ताव वर सही करुन रिंगरुट प्रकल्प मार्गी लावला व रिंगरोड बाधीत रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे केडीएमसी रिंगरुट रोड घर बाधीत सर्वसामान्य गोरगरीब रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)