विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई :
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवत भाजपा क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयाबाहेर एकत्र येत एकच जल्लोष केला आहे. जनतेला भावनिक गोष्टींपेक्षा विकासाचे राजकारण हवे आहे.त्यामुळे राज्यातील जनतेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे असे विधान भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी यावेळी केले आहे.दरेकर यांनी म्हटले आहे की भाजपने दैदीप्यमान असे यश संपादित केले आहे. आमच्या पाठोपाठ अजित पवार गट,एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे मिळून जवळपास ७०% जागा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकल्या आहेत.गेल्या आठवड्यात भाजपाला टार्गेट करण्याचा हितक्षत्रूनी प्रयत्न केला होता.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु शिंदे,फडणवीस यांनी कधीही प्रतिकार केला नाही.त्यांनी सातत्याने सांगितले आम्ही काम करणारी लोकं आहोत. आम्ही विकासाचे राजकारण करतो.ग्रामपंचायत हा आपला राजकारणातील मूळ बेस आहे.त्याचं निवडणुकीत आज भाजपाचे सदस्य प्रचंड संख्येने निवडून आले आहेत याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र,ग्रामिण भाग हा भाजपासोबत आहे. लोकांना सुडाच्या राजकारणाऐवजी विकासाचे राजकारण आवडते हा संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला आहे.कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाची भाषा बोलत आहेत.अजित पवार हे विकासभिमुख काम करत आहेत त्यामुळे जनतेला भावनिक गोष्टींपेक्षा विकासाचे राजकारण हवे आहे.जे राजकारण आमची महायुती करू शकते यावर प्रचंड ताकदीने राज्यातील जनतेने शिक्कामोर्तब केले व देवेंद्र फडणवीस यांना कटघऱ्यात उभे करणाऱ्यांना राज्यातील जनतेने चपराक दिली आहे,अशी टिकाही दरेकरांनी विरोधकांवर केली आहे.ज्या ग्रामपंचायती आहेत त्यात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे प्रतिनिधीही आहेत.ही मराठा समाजाची भावना आहे.मराठा समाजाच्या प्रश्नासोबत भाजपा आहे.देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले होते हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे व भविष्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानेच ह्या गोष्टी मार्गी लागणार आहेत हा विश्वास महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आहे.त्यामुळे तमाम जातीधर्माना सोबत घेऊन विकासाभिमुख राजकारण करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा राज्यातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आमचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाचे राजकारण दाखवले आहे यावर पुन्हा एकदा राज्यातील सुसंस्कृत ग्रामीण भागातील जनतेने मोहोर उमटवली असल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.