शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
नांदुरा तालुक्यात झालेल्या संततधार आणि ढगफुटीच्या पावसाने थैमान घातले आहे. नदी नाल्यांना पूर येऊन शेत जमीन, नगदी पिकांचे आणि गावांचे नुकसान झाले आहे पुराचे पाणी गावात घुसून वित्त आणि जीवित हानी झाली आहे.तसेच शेतातील पीक व सुपीक जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. याकरिता महसूल विभागातर्फे तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या व्यक्तींना व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासाठी समितीत गठीत करून ऑन द स्पॉट प्रकरणे निघाली काढून नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्यावी. ज्यांचे घरे पडली, गुरे ढोरे व शेतीपयोगी साहित्य वाहून गेले अशांना ठोक रक्कम देण्यात यावी. शेतीकडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.आपत्ती नुकसान पंचनामे करण्यास किंवा नुकसान भरपाई मिळवून देण्यास टाळाटाळ किंवा तिरंगा केल्यास वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले. निवेदन देतेवेळी अजबराव वाघोदे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, राष्ट्रपाल सपकाळ तालुका युवा आघाडी अध्यक्ष, भगवान इंगळे जि. उपाध्यक्ष ,विलास तितरे अनिल धुंदळे, प्रकाश इंगळे, दिलीप मेढे, अँड. संजय इंगळे, निलेश वाघ ,निरंजन तायडे, आनंदा तायडे ,अमरदीप तायडे ,दिलीप तायडे ,योगेश वाघोदे, रमेश जाधव,गजानन वाघ व असंख्य कार्यकर्ते हजर होते.