विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:हिंगोली मतदारसंघातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मागील महिन्यात पेरणी केलेले पीक सोयाबीन ,तूर,कापूस,हळद,ऊस यासारख्या अनेक पिकाचे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेले,तर नदी नाल्याना उर येवून जनजीवन विस्कळित झाले आहे.शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हतबल झालेल्या शेतकऱ्याला पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी मागणी खा.हेमंत पाटील यांनी केली आहे.