विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:महागाव तालुक्यातील बार भाई तांडा येथील घराला आग लागून लखोचे नुकसान .येथील रहिवाशी असलेले बाबुसिंग केजाराम राठोड यांच्या घराला आग लागून यामधे लाखो रुपयांची नुकसान झाली आहे .शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी अशी मागणी हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष भाविक भगत यांनी केली आहे.यामधे शेतकऱ्याचे १५क्विंटल कापूस ७क्विंटल सोयाबीन ४०हजार रुपये नगदी १तोला सोन्याचे दागिने पूर्ण पणे जाळून खाक झाले आहे. बाबुसींग राठोड यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्यांनी लग्नाची सर्व खरेदी केली होती या अगी मध्ये पूर्ण जळून राख झाल्या मुळे राठोड यांचा संसार उघड्यावर आला आहे.त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी अशी मागणी हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष भाविक भगत यांनी केली आहे.त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.