विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड :१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वतंत्र झाला आज या गौरवशाली घटनेला ७६ वर्ष पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने उमरखेड येथे जिल्हा परिषद मुलांची शाळा, नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयात ठीक – ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार आनंद देऊगावकर, पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ, नगरपालिका मुख्याधिकारी महेश जामनोर, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखाडे, वाहतुक उपशाखा प्रमुख रोहित बेंबरे, आजी – माजी लोकप्रतिनिधी तसेच पत्रकार बांधव, रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, नंदू इटकरे, दिलीप मुनेश्वर व सामाजिक – राजकीय संघटनेचे पदाधिकारी व उमरखेड शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.