मनोज भगत
तालुका प्रतिनीधी तेल्हारा
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे क्रांती दिनानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियानातर्गंत विद्यार्थी व शिक्षकांनी पंचप्राण शपथ घेतली प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम देशाचे स्वतंत्र संग्रामातील सेनानिंना अभिवादन करुन भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.स्वतंत्र लढ्यातिल विर महात्म्याची शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहीती दिली प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र्यासाठी आपल्या जिवाचे बलीदान देऊन देशाला स्वतंत्र मिळवुन दिले अशा शुरविरांविषयी विद्यार्थ्यांनी माहीती दिली.शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ९ ॲॉगस्ट क्रांती दिनानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या शासनाच्या अभियानातर्गंत महोत्सवाचा पंचप्रण शपथ ग्रहण आयो सोहळा पार पडला त्यामध्ये भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे.गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायचीआहे.देशाच्या समृध्द वारशाचा अभिमान बाळगायचा आहे.एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे.नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे. अशी शपथविधी शिक्षक व विद्यार्थी यांनी घेतली.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निलेश येऊल सहाय्यक शिक्षिका माया मुकुंद कविता सोनोने सुवर्णा कातव शिक्षिका विशाखा सातारकर अमोल ताठे विवेक ढोकणे हर्षल सोळंके वैभव काळबांडे राहुल गिऱ्हे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.