शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
दिनांक 7 जुलै 2023 रोजी निंबा देवी संस्थान निंबोळा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 चा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीचे स्वागत आणि कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणे हे प्रमुख विषय होते. सदर कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष यशवंत इंगळे हे लाभले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरीश दाभाडकर संस्थापक तथा राज्यात सरचिटणीस, अल्लाउद्दीन काझी कार्याध्यक्ष, दिलीपराव डिके राज्यसचिव तथा जिल्हाध्यक्ष, रामेश्वर गायकी – राज्य मार्गदर्शक हे लाभले होते. प्रमुख उपस्थितीमध्ये समाधान वाघ गट विकास अधिकारी, प्रशांत जामोदे विस्तार अधिकारी कृषी. प.स.नांदुरा, राजेशजी नेमाडे विस्तार अधिकारी प.स.नांदुरा. , ग्रामसेवक संघटना नांदुरा ता.अध्यक्ष प्रदिप शिंदे, प.स.नांदुरा ASSK ता.अध्यक्ष. राहुल बोके, जिल्हा सचिव भरत सुपेकर, संगणक परिचालक संघटना ता.अध्यक्ष प्रविण साबे,तर तालुका कार्यकारिणी मार्गदर्शक म्हणून सुनिल जुमडे, शिवदास भगत, नारायण चंदनशिव, विष्णु कुरडकर, सुभाष म्हस्के, अंबादास राजेश गि-हे, संतोष दांडगे, भागवत झांबरे, ज्ञानेश्वर बाठे,गजानन खवले यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला . यामध्ये तालुका अध्यक्ष अमित डिवरे,ता.उपाध्यक्ष एकनाथ झाल्टे, ता.सचिव दिपक वाकोडे, ता.सहसचिव शिवशंकर गोसावी, सुनीलभाऊ जुमडे, ता.संघटक ता.सदस्य कैलाश अढाव ,गणेश साबे, ज्ञानेश्वर लांडे, शांताराम अढाव, गणेश बाणाईत, पवन ईगळे, प्रदिप तांदुळकर .यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गिरीश दाभाडकर यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख समस्या जाणून घेतल्या. किमान वेतन श्रेणी, वाढीव कर्मचारी वेतन, भविष्य निर्वाह निधी, वसुली ची अट रद्द करणे या प्रकारच्या गोष्टीवर मार्गदर्शन केले. यापुढे सुद्धा कोणत्याही अडचणी आल्यास सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. मा समाधानजी वाघ गटविकास अधिकारी यांनी सांगितले की ग्रामपंचायत कर्मचारी हे पंचायत समिती आणि नागरिकांच्या मधील दुवा आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्यांना दर महिन्याला पगार जमा होईल याची शाश्वती दिली. जिल्हाध्यक्ष यशवंत इंगळे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे महत्त्व विशद केले. ग्रामपंचायत कर्मचारी आणि मार्फत होणारे कार्य किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती दिली. वसुलीची आठ रद्द करण्यात यावी, जे कर्मचारी मानधन तत्वावर आहेत त्यांना कायम करण्यात यावे आणि नवीन कर्मचारी भरती करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष यशवंत इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन अमित डिवरे आणि दिपक वाकोडे यांनी केले.