यवतमाळ : मार्च महिन्यातील वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील वाहने लक्ष्य केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज गुरूवारी दुपारी वाहतूक शाखेने वाहने ‘टोईंग’ केल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयात येताना नागरिकांनी वाहने आणूच नयेत का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय आवारातील वाहने ‘टोईंग’ करण्याचा धडाका लावल्याने वाहनधारकांना हातातील काम सोडून गाड्या सोडवायला धावावे लागत आहे.



