अविनाश पोहरे ब्युरो चिफ, अकोला
श्री शिवाजी शिक्षण संस्था ,अमरावती द्वारा संचालित डॉ. एच. एन. सिन्हा कला, वाणिज्य महाविद्यालय पातुर, आय. क्यू. एसी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बिजनेस इथिक्स, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन बिजनेस इनोव्हेशन अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट ऑफ आत्मनिर्भर भारत या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले परिषदेचे उदघाटन माननीय दिलीपरावजी इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांनी स्वागत पर आपले विचार प्रास्ताविकातून व्यक्त केले त्यांनी महाविद्यालयातील गतकाही दिवसातील घडामोडींचा ओहापोहो आपल्या मनोगत आतून व्यक्त केला. महाविद्यालयामध्ये होणाऱ्या नवनवीन योजना व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेले पाऊल, यासंबंधी माहिती देत असताना प्राचार्य डॉ किरण खंडारे यांनी भविष्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे स्वागत करीत विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलले जाईल,असे प्रतिपादन केले, जानेवारी 2024 पासून महाविद्यालयात विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले जसे संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी कल्याण विभाग तर्फे कौशल्य विकास कार्यशाळा, विद्यापीठातील पहिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता कार्यशाळा, IPR,RAC, एक दिवशी कार्यशाळा घेऊन महाविद्यालयाची नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले, ही महाविद्यालयाची ख्याती तयार झाली,असे त्यांनी यावेळी स्वागतपर प्रास्ताविकात माहिती दिली, उद्घाटकीय मार्गदर्शनीय भाषणांमधून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष तथा डॉक्टर सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय स्थानीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप रावजी इंगोले साहेब यांनी राष्ट्रीय चर्चासत्राकरिता भारत देशातून विविध राज्यातून 150 चा वर विभिन्न भाषेत आलेले शोध निबंध देणारे प्राध्यापक संशोधक आणि विद्यार्थी यांची कौतुक केले व शोधनिबंधाचे आदान प्रदान करून विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये तो स्पर्धेत कसा टिकेल याचे चिंतन करावे, असा मौलिक संदेश त्यांनी दिला, आयोजन समितीचे अथक परिश्रम पाहून त्यांनी प्राचार्य डॉ.किरण खंडारे, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, तुळजराम चतुरचंद कॉलेज बारामती आणि समन्वयक डॉ. रोनिल आहाळे, यांचे अभिनंदन केले, याप्रसंगी मंचावर महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे,विभाग प्रमुख प्रा. हर्षद एकबोटे, संयोजक डॉ. रोनील आहाळे, प्रा.अविनाश पवार,प्रा. अतुल विखे, प्रा. चंद्रकांत धुमाळे, तर आभासी पद्धती द्वारे 200 पेक्षा अधिक प्राध्यापक,विद्यार्थी व संशोधक चर्चासत्राला उपस्थित होते. परिषदेचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले परिषदेमध्ये अनेक प्राध्यापक संशोधकांनी शोध निबंध सादरीकरण केले प्रथम सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे, विशेष उपस्थिती डॉ. आनंदकुमार पाल (प्रा. वाणिज्य विभाग अलाहबाद डिग्री कॉलेज, अलाहाबाद)यांनी आपल्या मार्गदर्शनात चार चरणामध्ये व्यवसाय वाढीस प्रेरणा कशी मिळाली याबाबत सखोल माहिती देताना त्यांनी पारंपारिक पद्धतीतून आधुनिक पद्धती व्यवसाय करणे शिवाय महान अर्थतज्ञ डॉक्टर मार्शल रॉबिन्सन यांच्या मते व्यवसाय करीत असताना लाभ कमविणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच सामाजिक दायित्व निभवणे देखील महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन करून तरुण संशोधकांना प्रेरित केले व बीजभाषक ख्यातनाम अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी आपल्या व्याख्यानातून दीडशे वर्षांपूर्वी असलेल्या वातावरणाचा व सध्या स्थितीत असलेल्या वातावरणात किती बदल झाला व तो कशा स्वरूपात याचे सखोल माहिती दिली त्यांच्या मते जगातील बहुतांश देश हे ग्लोबल वार्मिंग च्या सफेद मध्ये आलेले आहेत त्याचा परिणाम बे मोसम वातावरण बदलत आहे शिवाय नद्याचे पाणी दूषित होऊन वेळेआधीच नद्या अटक आहेत शिवाय वृक्षतोड त्यामुळे वातावरणातील बदल हा व्यवसाय वाढीला प्रेषित न होता दूषित होत आहे शिवाय त्यात काम करणारी कर्मचारी त्यांचं मनोबल त्यांची क्षमता यादेखील फार मोठा फरक पडलेला दिसून येतो याचा परिणाम व्यवसाय वाढीला फार मोठा चटका लावून जातो या कारणास्तव आपण सर्वांनी भविष्यामध्ये दूरदृष्टी कोण ठेवून आजपासून त्याविषयी उपाययोजना शोधल्या तर नक्कीच आपल्या सोबत येणाऱ्या भावी पिढीला देखील याचा नक्कीच फायदा होईल असे मौलाचे मार्गदर्शन केले, द्वितीय सत्राचे अध्यक्षपदी डॉ. अविनाश जगताप, प्राचार्य तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, पुणे यांनी शुभेच्छा देत डॉक्टर एजन्सींना कला वाणिज्य महाविद्यालय व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेने दोन विद्यापीठे दोन जिल्हे व त्यानिमित्ताने संशोधकांच्या विचारांची आदान-प्रदान सहजतेने होऊ शकले व याचा संशोधक विद्यार्थ्यांसाठी आणि भावी पिढीसाठी नक्कीच लाभदायक प्रेरणा घेतील असे मार्गदर्शन केले व बीजभाषक डॉ. दिनेश निश्चित सर अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी संशोधकांना संशोधन करीत असताना आवश्यक घटकांचा अभ्यास करून स्वतःबरोबर समाजाला व येणाऱ्या पिढीला तसा फायदा होईल यावर मार्गदर्शन दिले त्यांनी संशोधन कार्य करीत असताना वेगवेगळ्या पद्धतीने विषयी सखोल माहिती सादर केली,समारोपीय अध्यक्षपद मा. मिलिंद शाह वाघोलीकर सचिव अनेकांत शिक्षण संस्था बारामती,पुणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सिन्हा महाविद्यालय पातूर आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्राचे फार कौतुक केले व भविष्यात देखील असे वेगवेगळे कार्यक्रम एकत्रित करावे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने कार्य करावे, येणाऱ्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च संपूर्ण भारत वर्ष मध्ये आगमन होणार आहे त्याचे स्वागत करीत या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल व ते स्पर्धेच्या युगात स्वतःला कसे सामावून घेतील सोबतच यशस्वी होतील याविषयी सर्व संशोधकाने ग्रहण, चिंतन, मनन करून विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाद्वारे माहितीचे आदान प्रदान करून त्यांना योग्य बनविणे असे याप्रसंगी अपेक्षा बाळगत सर्वांना शुभेच्छा दिल्यात, डॉ. जनार्धन के. पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला बिजभाषक डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती यांनी मार्गदर्शन केले, राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध राज्यांमधून विविध भाषेत जसे कन्नड गुजराती संस्कृत हिंदी मराठी इंग्रजी अशा भाषेतून शोधनिबंध आलेत, राष्ट्रीय चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी या चर्चासत्राची कौतुक केले, चर्चासत्राच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ.रोनिल आहाळे समन्वयक, राष्ट्रीय चर्चासत्र यांनी स्वीकारली तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अतुल विखे, यांनी करून राष्ट्रीय चर्चासत्राची सानंदात सांगता केली, याप्रसंगी राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. रोनिल आहाळे यांनी मान्यवरांनी केलेल्या सूचनेची आम्ही सर्व संशोधक, प्राध्यापक वृंद पालन करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलू, अशी ग्वाही दिली.या राष्ट्रीय चर्चासत्राचे पंचकोशीत कौतुक पाहावयास मिळाले.