भारत बुरशे ग्रामीण प्रतिनिधी पुसद
पुसद-उन्हाळ्यात जंगली प्राणी पाण्यासाठी वन प्राण्यांची भटकंतीत वाढ होत आहे वाढत्या तापमानाच्या तुलनेत पाणीटंचाई काळामध्ये जंगलातील नैसर्गिक पाण्याची स्त्रोत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. वनक्षेत्रातील प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर नजीकच्या गावाकडे धाव घेण्याची शक्यता असते परिणामी मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यताही नाकारता नाही त्यामुळे मारवाडी वन परिक्षेत्रातील जंगलांमध्ये वन विभागा मार्फत पाण्याचे स्त्रोत्र निर्माण केले आहे मारवाडी वनपरिक्षेत्रातील मारवाडी (बु) शिवानी, बेलोरा, पन्हाळा, मारवाडी (खुर्द), सत्तरमाळ, हनवतखेडा, लाखी,ब्राह्मणगाव, उडदी पूर्व पश्चिम या बेटातील जंगल क्षेत्रामध्ये कृत्रिम पानवटे ,सिमेंट टाक्या ,नैसर्गिक पानवाट्यांमध्ये वन हे भागांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे सर्व पानवटे पाण्याने तुडुंब भरले आहेत या उपक्रमामुळे वन विभागाने वन प्राण्यांच्या तृष्ण तृप्तींची सोय केली आहे पाण्याअभावी वन प्राणी पाण्याच्या शोधात गावात रस्त्यावर येतात परिणामी अपघात शिकार व मानव संघर्ष वाढतो या सर्व बाबींचा विचार करून पानवटे तयार केले आहे या उपक्रमांसाठी वन विभाग उपवनरक्षक डॉ. बी . एम . स्वामी नरोडे, सहाय्यक ,वनरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल झांबरे, मारवाडी क्षेत्र सहाय्यक राठोड, क्षेत्र सहाय्यक अंभोरे ,ठोंबे ,वनरक्षक मुसळे, बोरचरे, खंदारे, वैद्य ,आठवले ,भिसे ,डहाके ,मस्के, कराळे ,गंगावणे व हरिपाल आडे यांनी सहभाग घेतला.