संदिप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
पुणे – सोलापूर महामार्गावरील लगतचा चौफुला येथील सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने व कायमस्वरूपी बुजवावे यासाठी रोड प्रशासन दखल घेत नसल्याने बोरीपार्धी, धायगुडे वाडी, चौफुला ग्रामस्थ याच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी चोफुला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या सेवा रस्त्यावर अनेक दिवसापासून मोठ मोठे खड्डे पडले होते तसेच त्या खड्ड्यात पाणी साठून पडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचाकांना अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात होत होते अनेक वेळा सांगूनही या कडे जाणून बुजून लक्ष दिलं जातं नव्हते.तसेच येथील प्रवास हा जीव मुठीत धरून करावा लागतो.शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, शेतकरी, दुग्ध व्यवसयिक,प्रवाशी वर्ग,व्यावसायिक यांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी देखील केल्या मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आम्हाला आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे.असे प्रतिपादन बोरीपार्धी चे सरपंच सुनील सोडनवर यांनी केले. आंदोलनं सुरू केले असता यवत पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे साहेब ,बारवकर साहेब , कुतवळ साहेब यांनी निवेदन स्वीकारले व सदर प्रकारची सबंधित अधिकारी वर्ग यांना सूचना देऊन तातडीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. महामार्ग अधिकाऱयांनी ही तातडीने कामाला सुरुवात केली .याप्रसंगी भिमा पाटस चे मा उपाध्यक्ष आनंद थोरात, बोरीपर्धी चे सरपंच सुनील सोडनवर, मा. उपसरपंच संपत मगर, संजय धायगुडे, रघुनाथ सरगर,दिनेश गडदे सर , सिध्देश्वर सरगर, राजू कोळपे, सह परिसरातील अनेक पदाधिकारी व नागरीक उपस्थीत होते.