बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटना व शेतकरी यांनी मागील महिन्यात दूध आंदोलन केले होते. याची दखल घेऊन राज्य सरकारने ३.५ फॅट व ८.५ एस एन एफ ला ३४ रुपये दुधाचे दर बंधनकारक केले होते.परंतु नेहमीप्रमाणे दूध संस्था चालक यांनी दुधाचा एस एन एफ कमी दाखवून ०.१ टक्का ला .१ रुपया कमी करून पुन्हा शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे. त्यामुळे ३४ रुपये दुधाच्या दरासाठी ३ फॅट व एस एन एफ ८ करावा.
अन्यथा गाईच्या दुधाला आहे त्या फॅट व एस एन एफ ला ५० रुपये दर बंधनकारक करावा .
कारण दुधासारखे अमृत तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना संस्थाचालक लुटत आहे.त्यामुळे याबाबत योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १४ कोटी लिटर दूध उत्पादन क्षमता असताना ६४ कोटी लिटर दुधाची विक्री होत आहे. याचा अर्थ ७० ते ८० टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. त्यामुळे ग्राहकांना विकतचे दुखणे खरेदी करावा लागत आहे.म्हणजेच थाळी वाजवून साप घरात घेतल्या सारखेच आहे. आणि जनतेने यावर आरोग्यासाठी काळजी करणे गरजेचे आहे. अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे बंधनकारक करावे. त्यामुळे खरे दूध उत्पादक शेतकरी व वास्तवातील दूध यांचा ताळमेळ बसेल व खरी माहिती पुढे येईल. त्याचप्रमाणे शेती व्यवसायामधील सर्वात मोठा दूध धंद्याची एकदा इ डी मार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
त्यामुळे वास्तव समोर येईल व दुसऱ्या बाजूला भेसळीला ही आळा बसून शेतकऱ्यांना योग्य असा बाजार भाव मिळेल. त्यामुळे वरील विषयावरती त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे.अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भानुदास शिंदे,प्रदेश अध्यक्ष.रयत क्रांती पक्ष.यांनी केली आहे.