कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अण्णाभाऊ साठे नगर मधील नागरिकांचे घर पुरात वाहून गेले.त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांचे वास्तव्य सध्या जि.प.मुलांची शाळा सोनाळा येथे आहे.याची पाहणी करण्यासाठी सोनाळा येथील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः अण्णाभाऊ साठे नगर मधील घराची पाहणी केली.तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था शाळेमध्ये केली असून त्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे.गावातील प्रथम नागरिक म्हणून आपले कर्तव्य युवा सरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यानी पार पाडले आहे.मात्र भविष्यात असे घडू नये म्हणून याला संरक्षण भिंत असणे गरजेचे आहे.