शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांनी यांचा वाढदिवस आगळावेगळा पद्धतीने साजरा केला त्यांना अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले
कोरोना काळात ज्या वेळेला सगळ्या जगातील व्यवसाय बंद होते त्यावेळेला फक्त शेतकरी राजाचा व्यवसाय चालू होता आणि सगळ्या जगाचे पोट भरण्याचं काम शेतकरी राजा करत होता हे आपण सर्वांनी पाहिले आणि म्हणून यावर्षीचा वाढदिवस शेतात घाम गाळणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या सोबत करण्याचा निश्चय केला होता मनात आले असते तर एखाद्या राजकीय नेत्याच्या सोबत , संत मंडळी सोबत ,शाळेमध्ये ,अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात अशा ठिकाणी करता आला असता पण या ठिकाणी बरीच मित्र मंडळी वाढदिवस साजरा करताना दिसतात पण आपल्यावर जे खरे उपकार आहेत ते भारताच्या सीमेवर खांद्यावर बंदूक घेऊन जवान उभे आहेत म्हणून आपण रात्री सुखाने झोपतो आणि रात्रंदिवस काबाळ कष्ट करून शेतात राबराब राबून आपल्याला पोटभर खायला अन्न पुरवतो तो अन्नदाता म्हणजे शेतकरी राजा या दोघांच्या आहेत त्यामुळे यावर्षीचा वाढदिवस आमच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून ज्यांनी आमच्या शेतीमध्ये यावर्षी पेरणी केली त्या सर्व मजूर लोकांना घरी सन्मानाने भोजन, शाल ,श्रीफळ व त्यांचे पूजन करू वाढदिवस साजरा केला माझी माझ्या मित्रांनाही विनंती असेल या बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपणही आपल्या शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी राजाचा असाच येथोचीत सन्मान करण्याचा संकल्प करून जुन्या चालीरीतीला फाटा देत हा नवीन उपक्रम राबवावा अशी विनंती वाढदिवसाच्या प्रसंगी ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या वतीने करण्यात आली. बळीराजा स्वरूपात गजाननराव सदाफळे, किसनराव गवळी, वासुदेव रामेकर,अजाबराव कुचेकर,मोहन मालवे, माधव मालवे , विठ्ठलराव रामेकर यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती गजानन मोडक यांनी दिली