गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : आई आणि मावशीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेद्वारे मिळालेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी अनेक वेळा शासनाकडे चक्र मारून सुद्धा जमीन मिळाली नाही, म्हणून, मंठा तालुक्यातील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वतःला जमिनीत पुरून आगळे वेगळे आंदोलन करून, शासनाच्या संधी साधून नीतीचा विरोध केला. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना द्वारे कौशल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नंबर 401 मध्ये प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मिळाली होती. सदरील जमिनीचा ताबा मिळवण्याकरिता, त्या 2019 पासून प्रयत्न करत होत्या. जाधव यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदन दिले, निवेदन देऊन सुद्धा अद्याप पर्यंत जमिनीचा ताबा न मिळाल्याने, परेशान होऊन शेतकरी सुनील जाधव यांनी, सोमवारी सकाळी दहा वाजता हेलस शिवारात स्वतःला जमिनीत पूरून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्णय जाधव यांनी घेतला आहे. आता शासन काय निर्णय घेते यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.