रितेश कुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी सोई-सुविधा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्दी व मेहनती आहेत असे उद्गार प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काढले.कार्ला येथील शेतकरी कन्या कु.राधा बाबुराव भराटे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत ७२० पैकी ६३५ गुण मिळवत घवघवीत यश मिळवले तिच्या या यशाबद्दल अनिल गावंडे यांनी तिच्या घरी जाऊन तिचा गुणगौरव केला.पुढे बोलतांना ते म्हणाले की राधाने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी अतिशय प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी राधाचे अनुकरण करावे असे ते म्हणाले.यावेळी कारल्याचे सरपंच नंदकुमार भराटे, लोकजागर मंचचे महेंद्र कराळे,गोपाल जलमकार, बाबुराव भराटे, भास्कर जवंजाळ,केशव शेंगोकार, गजानन चांदूरकार, दिपक भराटे, राधेश्याम भराटे, उल्हास भराटे, विनायक भराटे, प्रशांत भराटे, सागर भराटे, मयुर भराटे इत्यादी उपस्थित होते.सरपंच नंदकुमार भराटे यांनी सुद्धा अनिल गावंडे यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)