संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार (अक्कलकुवा ): राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची 18000 हजार पदांची भरती तात्काळ करा अशी मागणी ट्रायबल फोरमच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत अक्कलकुवा निवासी तहसीलदार गांगुर्डे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ट्रायबल फोरमच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 2011 पासून शिक्षक भरती बंद होती. आणि ती बंदी 2019 मधे उठवण्यात आली मात्र साडे तीन वर्ष लोटूनही शिक्षक भरती करण्यात आली नाही. म्हणजे 11 वर्षपासून शिक्षक भरती करण्यात आलीच नाही त्यामुळे राज्यात जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये सुमारे 18000 हजारानवर पदे रिक्त आहे. ग्रामीण व शहरी भागात गरिबांचे मुले, मुली शिक्षण घेत आहे. ज्ञानदान करणारे शिक्षकच नसेल तर विद्यार्थी कशे शिकतील शिक्षकांविना शिक्षण व्यवस्थेचा कोणा मोडून जाईल. भविष्यात पिढी बरबाद होईल आणि या पिढीचे भविष्य उज्वल करण्यासाठी व जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भरती करणे अत्यंत महत्वाचे आहे.
एकीकडे देशात राज्याचे शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे तर दुसरी कडे शिक्षकांचा तूटवडा असतांना शैक्षणिक प्रगती कशी साधणार असा प्रश्न निवेदनात उपस्थित आहे. 30विद्यार्थ्यांमागे 1शिक्षक या PTR वर नुसार शिक्षकांच्या नेमणूकीला मंजुरी दिली जाते.सध्याचाच पट संख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी 18000 हजार पदे रिक्त आहेत.2019 मधे पवित्र पोर्टल आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी 2019 च्या डिसेंबर महिन्यात अधीयोग्यता चाचणी घेण्यात आली. त्यात पावणे दोन लाख (बीएड ) धारकांनी परीक्षा दिल्या. नंतर केवळ 4 ते 5 हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. असे निवेदनात नमूद करून राज्यात मराठी माध्यमाची 16748 आणि उर्दू माध्यमाची 1301 पदे रिक्त आहे. ही पदे कालबद्ध कार्यक्रम आखून तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर ट्रायबल फोरमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश वळवी, जिल्हा संघटक अनिल वसावे, तेजस पाडवी , मधुकर पाडवी, तालुकाध्यक्ष सिमा तडवी, मनिष वळवी अनिल वळवी आदीच्या सह्या आहेत.