शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात जागतिक जलदिन (२२मार्च ) साजरा करण्यात आला.इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्व विशद करणाऱ्या चित्रांद्वारे पाण्याचे नियोजन किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले.काही विद्यार्थ्यांनी ‘पाणी जीवन आहे ‘या विषयावर निबंध लिहिले.सहशिक्षक विजय चौधरी यांनी पाण्याची सद्यस्थिती व दुष्काळाचे भीषण वास्तव काय आहे याची विद्यार्थ्यांना माहिती दिली .पाण्याचे उपयोग ,जनजागृती ,पाणी व पर्यावरण यांचा सहसबंध स्पष्ट केला.