आढावा बैठक : नरेंद्र पाटील यांच्या सुचना
बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिगोली : आर्थिक मागास विकास महामंडळामार्फन प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी व ज्या प्रवर्गासाठी स्वतत्र महामंडळ आस्तित्वात नाही, अशा करीता स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी बँकानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पात्र लाभाथ्याची कर्ज मंजुरीचे प्रस्ताव सुलभ पद्धतीने व वेळेत मार्गी लावावेत, अशी सुचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ( मंत्री ) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १० जानेवारी रोजी मघमंडळाच्या योजनाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होत. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , अप्पर जिल्हधिकारी खुशालसिंह परदेसी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शक केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ राजपाल कोल्हे, महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे , अल्ताफ शेख यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबविण्यात येते. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजना आहेत असे सांगून पाटील म्हणाले की बँकानी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब करू नये. प्रस्तावात त्रुटी असतील तर त्याचे तात्काळ निकारण करून घ्यावे. विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये . खाजगी व कॉपेरेटिव्ह बँकाचे काम चांगले असून राष्ट्रीय बँकानी गांभीर्य पूर्वक लक्ष देवून प्रलंबित व नविन प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यानी आपल्या शाखा व्यवस्थापकांना पत्राद्वारे महामंडळाच्या योजनाचे महत्व सांगून प्राप्त प्रकरणे वेळेत मंजुर करण्याचे निर्देश द्यावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाने तालुकास्तरावर मेळावेही घ्यावेत अशी सुचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या. भविष्यात मदमंडळामार्फत शैक्षणीक कर्ज योजना व दोन लाखा पर्यन्त कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामडळामार्फेत राज्यात आता पर्यन्त ७४ हजार ९७५ लाभार्थ्यांना बँकेने कर्ज वितरीत केले आहे. यापैकी ६४ हजार ९०३ लाभाथ्यांना ६१६ कोटी रुपयाचा व्याज परतावा मंजुर केला आहे. हिंगोली जिल्हात आता पर्यंत ५५० लाभार्थ्याना ३५. १४ कोटी रुपये बँकेनी वितरीत केले आहेत. यापैकी ४६८ लाभार्थ्याना मंडळामार्फत ४.१५ कोटी रुपयाचा व्याज परतावा मंजुर करण्यात आला असल्याचे सांगीतले. जिल्हाधिकारी म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना बेरोजगार तरुणासाठी लाभदायी आहेत. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकानी निर्णय प्रक्रिया जलदगतीने राबवावी. प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत. बँक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठकीत या योजनेचा प्रामुख्याने आढावा घेण्यात येईल. बैठकीत पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या , तसेच ज्या लाभाथ्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या . पण लाभाथ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्या नंतर अर्ज प्रकरण बँके कडे लाभार्थी घेऊन गेले असता अशी कोणतीही योजना ही असे बँक शाखाधिकारी यांच्या कडून उतर मिळते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)