महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१६:-वरोडा जिल्हा झालाच पाहीजे अशी मागणी वरोडा येथील गुरुदेव प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांनी वरोडा जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केली.मागील अनेक वर्षापासून वरोडा जिल्हयाची मागणी विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडून केली जात आहे. वरोडा जिल्हा झाला तर वरोडा शहराचे व त्यातील अनेक गावांचा विकास होईल. यावेळी वरोडा जिल्हा झालाच पाहिजेच्या जयघोषाने वरोरा शहर दुमदुमले. वरोडा शहर हे महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्हयातील एक महत्वाचे औद्योगिक शहर असून येथे नगरपालिका असून ब्रिटीश काळात हे शहर मध्य प्रांताचा एक भाग होता. हे शहर कोळसा खाणीचे केंद्र होते. वरोडाचे शहराचे मुख्य आकर्षण प्रसिध्द आनंदवन आहे. समाजसेवक बाबा आमटे यांची कर्मभूमी येथे असून कुष्ठरोगग्रस्तांचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणाचे कार्य या केंद्रात केले जाते. यावेळी भाजपाचे डॉ.भगवान गायकवाड, बाबा भागाडे, रमेश राजूरकर,ऐतेशाम अली, प्रवीण सुराणा, सुरेश महाजन, प्रा.रूपलाल कावळे, अशोक रोकडे, जडेकर गुरुजी, योगिता लांडगे, सुनिता काकडे, लभाने ताई, रंजना पारशिवे, चिमूरकर मॅडम, कातोरे मॅडम तसेच वरोडा जिल्हा संघर्ष समितीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.