शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
उमरखेड : शहरात स्वातंत्र्य दिनी काळा दिवस पाळून हातात विशिष्ट रंगाचे झेंडे घेऊन काढण्यात येणाऱ्या पदयात्रेला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारावी अन्यथा आम्ही सुद्धा त्याच वेळी त्याच ठिकाणापासून संविधान तिरंगा रॅली काढू असा इशारा वंचित बहुजन आघाडी, पुरोगामी युवा ब्रिगेड, भीम टायगर सेना, रिपब्लिकन युवा सेना तर्फे निवेदनामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आला आहे. उमरखेड शहरातील काही वादग्रस्त संघटनातर्फे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन हा काळा दिवस पाळला जात आहे. तसेच तिरंग्याला विरोध करून एका विशिष्ट रंगाचा झेंडाच हा आपल्या देशाचा झेंडा आहे असा देशविरोधी प्रचार काही संघटनातर्फे केला जात आहे. देशाच्या तिरंग्याला व राष्ट्रगीताला विरोध करणाऱ्या एका संघटनेतर्फे स्वातंत्र्य दिनीच पदयात्रा काढण्यात येणार आहे याविरोधात उमरखेड शहरातील आंबेडकरी पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून अश्या वादग्रस्त पदयात्रेस परवानगी दिल्यास उमरखेड शहरातील सर्व संविधान प्रेमी संघटना पक्ष त्याच वेळेस त्याच ठिकाणावरून संविधान तिरंगा रॅली काढेल असा इशारा देण्यात आला असून यामुळे उमरखेड शहरात स्वातंत्र्य दिनी गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जाँटी विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड,वंचित चे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे ,पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे पाटील, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, भीम टायगर सेनेचे सिद्धार्थ दिवेकर, रिपब्लिकन युवा सेनेचे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, शाहरुख पठाण, ज्ञानदीप कांबळे, विष्णुकांत वाढेकर, सतीश खाडे, शेख इरफान, भीमराव खंदारे, विश्वास धुळे आदी उपस्थित होते.