डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधि
परभणी.
परभणी ०९: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान आज, 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयामध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुयवंशी यांनी ‘भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु’ ही पंचप्रण शपथ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा आज, 09 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. यानिमित्त जिल्ह्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी मिट्टी-मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरा पासून ते जिल्हा स्तरापर्यंत विविध उपक्रम आयोजित केले जातील. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

