महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त घेण्यात आली स्पर्धा…तालुक्यातील 425 विदयार्थ्यांचा परीक्षेला उत्सपूर्त प्रतिसाद…
अविनाश पोहरे. ब्युरो चीफ, अकोला
पातूर : समता पर्वाचा मुख्य उद्देश लोकांना संविधान आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व समजावणे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे आहे.याच अनुषंगाने 11 एप्रिल 2025 रोजी संत सेवालाल म.भवन येथे समता पर्वा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सामाजिक उपक्रम हा ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, युवा लोकचळवळ मंच, व द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्था पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण ग्रामसेवक स्नेहल गवई, युवा लोकचळवळ चे संस्थापक मा.अमोल घायवट, द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष ऍड.पंकज पोहरे, जयेंद्र बोरकर योगेंद्र बोरकर, कु.अश्विनी अंभोरे यांच्या हस्ते रितसर करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इंजि. सतिश देवराव हातोले, अविनाश सुरेश पोहरे, किशोर सुरवाडे, कु. मृणाल इंगळे, सुरेंद्र अवचार, लावण्य अतकर, आशिष शेगोकार,शिलवंत हातोले यांनी अथक परिश्रम घेतले.व निखिल उपर्वट, हेमंत घुगे, अंबादास इंगळे हे उपस्थित होते.सदर तालुकास्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतून 425 विदयार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.


