महेश आप्पा सावंत शहर प्रतिनिधी मुंबई
मुंबई : एम पूर्व आणि एम पश्चिम वॉर्डातील, विशेषतः चेंबूर,अणुशक्ती नगर परिसरात फेरीवाल्यांना मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याचा आरोप होत आहे. फूटपाथ व रस्त्यांवर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई केवळ दिखाव्यासाठी केली जाते मात्र त्यांना कायमस्वरूपी हटवले जात नाही.राजकीय पक्षांना मतदानासाठी फेरीवाल्यांचे पाठबळ आवश्यक असल्याने त्यांच्यावर कठोर पाऊल उचलले जात नाही अशी चर्चा सुरु आहे याशिवाय महापालिका अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत. फेरीवाल्यांनी व्यापलेल्या फूटपाथ, रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.बीएमसी अधिकारी फक्त दंड वसूल करण्यापुरतेच मर्यादित राहतात पण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत नाहीत.अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणीही घेत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष वॉर्ड क्र १४८ सौ. सरोजिनी महेश सावंत यांनी या संदर्भात मुंबई महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी नागरिकांना या समस्येवर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या शैला सावंत,वंदना कांबळे,रवीना कांबळे,स्नेहा मानव, राधिका मानव, कल्पना काळे यांनीही नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


