आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड
खालापूर :- रायगड जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या शाखा रायगडच्या नेतृत्वाखाली दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. चोरामले साहेब यांना संघटनेच्या खालापूर शाखेच्या कार्यकारिणी संदर्भात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना शाखा खालापूरच्या कार्यकारिणी संदर्भात निवेदनग गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले व त्यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली तपूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन व परिचय आणि कार्यक्रमाची सुरुवात रायगड जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मंदार रसाळ यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून संघटनेच्या मागण्यांविषयी थोडक्यात माहिती दिली. व संघटनेच्या मागण्यांचे सादरीकरण अध्यक्षनीय भाषणात संघटनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे मांडण्यात आले. शासनाने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घ्यावा. नवीन पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.जुनी पेन्शन संबंधी इतर जिल्ह्यातील हालचाली आणि न्यायालयीन प्रकरणांचा आढावा त्यांनी दिला. त्या संदर्भात निवेदन संघटनेच्या वतीने मा. श्री. चोरामले साहेब गटशिक्षणाधिकारी, खालापूर यांना अधिकृत निवेदन सुपूर्द करण्यात आले. त्यांनी निवेदनाची गंभीर दखल घेतली आणि यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी सर्व उपस्थित सदस्यांनी विचार मांडले त्या वेळी मा . गटशिक्षणाधिकारी यांचा प्रतिसाद लाभून माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी उपस्थित सदस्यांचे मुद्दे ऐकून घेतले. आणि निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी सांगितले की सदर मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. शासन स्तरावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जातील.•संघटनेच्या मागण्यांचा अभ्यास करून तदनुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.या वेळी उपस्थित सदस्य व नवनिर्वाचित खालापूर जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रमोद फकिरे, रवीकुमार बत्तीनवार, श्रीकांत पोकळे, उस्मान शेख, राजेंद्र दुर्गे, भूषण पिंगळे, रामस्वरूप बिरादार, संतोष गारगोटे, रवींद्र घोगरे, अमोल पाटील, परशुराम तासतोडे, अमोल म्हस्के, महेशकुमार पाटील, गजानन निकम, विशाल गावडे, अमित कांधरे, भागिनाथ पोटे,राजाभाऊ करपे, रामेश्वर बिरादार, श्रीकांत जठार, मच्छिंद्र खेमनार, सुदर्शन आंधळे, विनोद लंके, प्रविण कोल्हे, अमोल मस्के, सुधीर राठोड, दीपक अकोलकर, विनोद नारागुडे, अभिजित विशे. उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनेच्या मागण्यांचा ठाम पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला असुन मा.गटशिक्षणाधिकारी यांनी निवेदन स्वीकारले असून त्यावर पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संघटनेच्या मागण्यांसाठी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन संघटनेची ताकद दाखवली.संघटनेच्या हक्कांच्या लढ्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. यापुढेही संघटना आपल्या मागण्यांसाठी प्रयत्नशील राहील आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष श्री. मंदार रसाळ सर यांनी केले.


