महेंद्र गोदाम ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
अंबाजोगाई ,घाटनांदुर दि. 0 5 एप्रिल – घाटनांदुर परिसरात काल दि03 सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून, व शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.दुपारनंतरच आकाशात काळे ढग जमू लागले होते. संध्याकाळी सुमारे 4 वाजता वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. विजांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी तुंबले.काही भागांमध्ये झाडे उन्मळून पडली, घाटनांदुर साळंकवाडी या रस्त्याची दोन तास वाहतूक बंद होती, झाडे पडल्यामुळे तर वीजपुरवठाही खंडित झाला होता .शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस मोठी समस्या ठरू शकतो, ज्यारी , गहू आणि अन्य पिके सध्या काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तसेच आंबा या फळाचे अवकाळी पावसाने व वाऱ्याने झालेले दिसून येते हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


