शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.29 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोनाच्या समर्थनार्थ शासनाला चाळीस दिवसाची मुद्धत देऊन हि शासनाने कुठलीच हलचाल केली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाराजीचे सूर उमटले असून गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना,पुढऱ्यांना गाव बंदी प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो पर्यंत मराठा समाजास कुणबी मध्ये आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्याच परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याचेच पडसाद सेलू तालुक्यात निपाणी टाकळी,करडगाव,कवडधन,आंबेगाव, गोगलगाव, काजळी रोहिणा आदी ग्रामीण भागामध्ये उमटले असून मराठा समाजात तीव्र संताप निर्माण झाल्यामुळे सर्वांनी मनोज जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी टाकळी येथे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी त्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये जाऊन लोकामध्ये जनजागृती केली त्याच्याच परिणाम म्हणून काल पासून समस्त मराठा समाजातर्फे साखळी उपोषण व आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला असून काल पासून सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले. त्यास अनेकांनी पाठींबा दिला.
आज निपाणी टाकळी पाटीवर सुरूअसलेल्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस त्यामध्ये आज करडगाव येथील सकल मराठा समाजा च्या ग्रामस्थांनी दिवस भर आमरण उपोषण केले. त्यामध्ये त्रिंबकराव मगर, आत्माराम मोकाटे, भास्करराव मगर, सिद्धेश्वरराव झोल, महेश काटे, ज्ञानेश्वर मगर, एकनाथराव शिंदे, गोविंद शिंदे, प्रकाशराव शिंदे, चंद्रशेखर शिंदे, कृष्णा शिंदे, अशोक शिंदे विष्णू मगर, अर्जुन शिंदे, नागेश साबळे, संजय मगर, साईनाथ शिंदे ,अनिकेत मगर, विश्वजीत शिंदे, गोविंद नगर, इत्यादी ग्रामस्थां नी सहभाग नोंदवला. आज निपाणी टाकळी चे सरपंच सुनील सावंत,सेलू तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपाध्यक्ष प्रकाश मुळे, सेलू पोलीस स्टेशनचे पीआय श्री चौरे साहेब, ढेंगळी पिंपळगाव सज्जाच्या तलाठी नीलम बेलदार मॅडम, निपाणी टाकळी चे ग्रामसेवक श्रीदेवी नटवे, यांनीही उपोषण स्थळाला भेट दिली.निपाणी टाकळी येथील सर्व समाज बांधवांनी उपोषण स्थळी भेट दिली त्या मध्ये अहमद भाई शेख, गंगाधर गिराम ,विकास गिराम,एकनाथराव हरकळ,नंदू अबा मुळे,बालाजी चींचाने, गवारे आदी सर्व समाजातील बांधव उपोषणाला पाठिंबा देत आहेत.तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्त मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा. असे सर्व समस्त मराठा समाजाची मागणी आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)