शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : धर्मा-धर्मात वितूष्ट निर्माण करुन, धर्मात वितूष्ट निर्माण करुन, दंगली घडविण्याचे प्रयत्न देशात मोदी-शहा सरकारकडून सुरू आहेत. देशाचे सार्वभौमत्व या विखारी राजकारणामुळे धोक्यात आले आहे. देशातील सर्वच घटनात्मक संस्था दबावात काम करत असल्याने त्यांच्या स्वातंत्र्यासाठी देशात आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सेलू च्या जनतेला ‘निर्भय बनो’ चा नारा दिला आहे. सेलू येथील साई नाटगृह येथे दिनांक 11/10/23 बुधवारी रात्री 7 वाजता
निर्भय बनो मंच द्वारा आयोजित जनसंवाद सभेमध्ये ते बोलत होते.या कार्यक्रम चे अध्यक्ष कॉ रामकृष्ण शेरे पाटील तर स्वागतध्यक्ष श्री महेमूद सर होते. व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख होते. देशात सुरु असलेल्या धार्मिक उन्मादाविरुद्ध तसेच देशातील निवडणुक आयोग, निती आयोग, प्रवर्तन निर्देशनालय, सी.बी. आय आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण मोदी व शहा सरकारने सुरु केले असून त्याविरुद्ध देशातील एकही विरोधी पक्ष आवाज उठवत नसल्याचे चित्र सध्या देशात आहे. सध्या धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. धर्मा धर्मात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अशा विखारी वातावरणात व्यवस्थेविरुद्ध लढा उभारण्याची जबाबदारी ही समाजातील सामाजिक भान असलेल्या नागरिकां कडे येते याची जाणिव ठेवून सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी यांनी राज्यात ‘निर्भय बनो’ आंदोलनाचा नारा दिला आहे. यानी ‘निर्भय बनो’ मध्ये सामिल होण्याची हाक दिली. ज्यांनी स्वातंत्र संग्रामात इंग्रजांची तळी उचलली ते हेगडेवार, गोळवलकर व त्यांचे शार्गिद आज देशाला भंपक राष्ट्रवाद शिकवू पाहात असल्याची जहरी टिका त्यांनी मोदी-शहा सरकारवर केली आहे. आम्हाला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताला विरोध करणाऱ्यांची परंपरा नको तर सर्व समाजाला एकत्र गुंफणारी गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल यांची परंपरा हवी असे यावेळी ते म्हणाले. सभांमध्ये केंद्र सरकार विरोधात शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकां मध्ये प्रचंड नाराजी असून बाबासाहेबांची घटना वाचविण्यासाठी मोदी-शाह यांना 2024 मध्ये बदल करणे गरजेचे असल्याचा संदेश त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून दिला.यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुर्ण वेळ राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा देवून राजकारण मंत्री होण्याचा अनाहूत सल्लाही दिला. मोदींच्या समान नागरी कायदा लागू करण्या संदर्भात घोषणेवर त्यांनी टिका करुन निवडणुका तोंडावर आल्या की त्यांना याची का आठवण येते? असा सवाल उपस्थित केला. हा कायदा लागू करण्याचे राज्यांना अधिकार असताना भाजपने आपल्या राज्यात तो का लागू केला नाही असा सवाल उपस्थित केला. आपण जातीभेद धर्मभेद जातीय तंटा याला बळी न पडता सहिष्णुता व सर्वधर्म समभाव जो देशाचा मुलभूत गाभा आहे तो टिकवण्याचे आवाहन यावेळी केले.‘निर्भय बनो’ मंच व समविचारी संघटनांच्या माध्यमा तून आयोजित करण्या त आलेल्या या जन संवाद सभेत माजी नगराध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर, अशोक काकडे, प्रेक्षा भाबळे, राजेंद्र लहाने, पत्रकार विचारवंत, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यां सह विविध पक्षातील राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला कार्यक्रम चे सूत्र संचालन कॉ रामेश्वर पौळ आभार ऍड विष्णू ढोले यांनी केले.