संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यात बनावट ताडी निर्मिती करून विक्री परप्रांतीय व स्थानिक लोक कडून रायसनायुक्त ताडी सर्रास विक्री होत आहे. अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल सातपूड्याच्या द-याखो-यात वसलेला दुर्गम अतिदुर्गम पाश्वभूमी असलेला तालुका असल्याने हा तालुका अवैध व्यवसायांचा अड्डाच बनलेला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील कोराई, खापर येथे मोठ्या प्रमाणत आड्डे आहेत. अक्कलकुवा तालुक्यात परप्रांतातुनआलेल्या लोकांकडून ठिकठिकाणी बनावट ताडीची दुकाने थाटलेली सर्सास दिसून येतात. तालुक्यात ताडीची कुठेही झाडे नसतानाही बनावट रासायनिक ताडीची सर्रास विकली जात आहे. कोणताही शासकीय परवाना नसताना हा प्रकार खुलेआम सुरू असून अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागाच्या परिसरात व गुजरात राज्याच्या हद्दीच्या जवळपास परप्रांतीयांकडून ताडीची विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामूळे तालुक्यातील व परिसरातील तरूणांच्या आरोग्यावर या बनावट ताडीच्या सेवनामुळे गंभिर परिणाम होताना दिसून येत आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात ताडीची झाडे नसुनही बोगस रायसायनिक पदार्थ वापर करून बनावट ताडी विकली जात आहे. विविध रसायनांपासून तयार केल्या जाणा-या ताडीमूळे आरोग्यावर दुरगामी विपरीत परिणाम होणार आहेत व वेळप्रसंगी अतिसेवनाने मृत्यू ही होवू शकतो. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात ताडीची झाडे नाहीच्या बरोबरीनेच आहेत. त्यामूळे विविध रसायनांचा वापर करून ताडी बनवली जाते. ती सर्रास ताडीच्या नावाखाली विकली जाते. अतिशय कमी खर्चात ही ताडी तयार होते. स्वस्तात नशा करायला मिळत असल्याने तरूण व मजूरवर्ग याकडे आकर्षित झाला आहे. रसायनांमूळे अनेकांचे चेहरे काळे पडले आहेत तसेच शरिरास सूजू लागते. व हळूहळू अनेक अवयव निकामी होतात. त्यात प्रामुख्याने किडनीचे विकार व लिव्हरचे आजारांना ताडीच्या आहारी गेलेला व्यक्ती बळी पडतो. तसेच तरूण वर्ग सराईस रात्र दिवस ताडी पिऊन रस्त्यावर अपघात होत. माञ विषारी दारूचे बळी पडल्यास प्रशासन जागे होते. तसे ताडीच्या बाबतीत घडत नसल्याचे चिञ स्पष्ट होत आहे. या जिवघेण्या ताडीच्या विक्रीवर कोणाचे नियंञण असते. स्थानिक पोलिस की दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग की अन्न व औषध प्रशासन विभाग. यातील ज्या विभागाची जबाबदारी असेल ते पार पाडत नसल्याचे स्षष्ट झाले आहे. या विभागांच्या अधिका-यांनी धृत्रराष्टासारखी सारखी डोळ्यावर घट्ट पट्टी बांधली की, काही अर्थकारण आडवे येत आहे असा प्रश्न सुज्ञ नागरीक करीत आहेत. जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली गेली. मात्र अद्यापर्यत एकही बनावट ताडी विक्रेत्यावर फौजदारी कारवाई केली गेली नाही? या आदिवासींच्या जीवाशी खेळणा-या परप्रांतीय बनावट ताडी विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई होणे जिल्हावासियांना तसेच तालुकावासियांना अपेक्षित आहे.