अजीज खान शहर प्रतिनीधी ढाणकी
उर्ध्व पैनगंगा ईसापुर धरणाचा डावा कालवा गांजेगाव सावळेश्वर कडे जाणारा, त्यावर ढाणकी गावाकडे येणारे मायनर असून, त्या मायनरला एक सबमायनर सावळेश्वर कडे जात असून, त्या सबमायनरला माझ्या शेताकडे व माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेताकडे अजूनही पाणीपुरवठा झाला नाही. या आशयाचे निवेदन ढाणकी येथील अल्पभूधारक शेतकरी अजिस खान पठाण यांनी प्रशासनाला दिले. संबंधीत सबमायनरला काही धनाढ्य शेतकऱ्यांनी सबमायनरमध्ये मुरूम, गिट्टी टाकून ते मायनर अलीकडेच गांजेगाव रस्त्यालगत आडवून ठेवले. त्यामुळे पाणी पुढे सावळेश्वर रस्त्यापर्यंत आलेच नाही. सदर पाण्याची मागणी अजीस खान पठाण यांनी स्वतः ऑक्टोबर २०२३ मध्ये पांडे या कर्मचाऱ्याजवळ केली होती, परंतु २०२४ चा मे महिना संपत आला असून सुद्धा अजूनही त्यांना पाणी मिळाले नाही.याबाबत पांडे यांच्याशी नंतर ५० वेळा फोन केला असता त्यांनी फोन सुद्धा स्वीकारला नाही. सध्या उन्हाची तीव्रता अधिक दाहक आहे. यामध्ये आमचे पीक अक्षरशः वाळून जात आहे. परंतु पाणी असतानाही आम्हाला भेटत नाही. आमच्या पलीकडील शेतकरी सबमायनरमध्ये बांध टाकून ते पाणी स्वतःच्या शेतात वळवत आहेत.यास आपल्या विभागाची मुक संमती आहे का ? सबमायनर मध्ये बांध टाकण्याचा कोणत्याही शेतकऱ्याला अधिकार आहे का ? जर तो अधिकार नसेल तर मग काही शेतकरी सबमायनरमध्ये बांध का टाकत असावेत आणि त्यावर तुमच्या विभागाचा वचक राहिला नाही का ? काही विशिष्ट शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक लागेबांधे तर नाही ना ? मी अल्पभूधारक शेतकरी असून संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्यावर व इतर सर्व गरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला.याबाबत सविस्तर सखोल चौकशी व्हावी व आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे. आमची पिके मरण्यापासून वाचवावी हे आपल्या हातात आहे.करिता आपल्या सेवेत अर्ज सादर.योग्य वेळेत कारवाई होऊन योग्य वेळेत आम्हाला पाणी मिळालं तर आमची पिके जगतील, पर्यायाने आम्ही जगू. अन्यथा आम्हाला आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. करिता आमच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई व्हावी.ही मागणी अजीस खान पठाण यांनी केली आहे.सदर निवेदनाची प्रतिलिपी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ,उपविभागीय अधिकारी उमरखेड,तहसीलदार उमरखेड,SC सर्कल ऑफिस चैतन्य नगर नांदेड,कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक ९ नांदेड,सी शाखा क्रमांक ५ उमरखेड,उपविभाग क्रमांक २ उमरखेड यांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)