सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगांव : तालुक्यात समज गैरसमज पसरविले जात आहे .दुष्काळा संदर्भात आजुन तालुका दुष्काळ जाहीर झाला नाही.दुष्काळाचा क्राईट भाग आपण बघितला आहे .नांदगांव तालुका दुष्काळजन्य परिस्थितीत आहे असे असताना नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेळ पडल्यास आपण कोर्टात कृषीविभाग राज्यशासनाच्या विरोधात रिट पिटिशन दाखल करु असा निर्वानीचा तथा( शासनाला घरचा आहेर असा) इशारा आमदार सुहास कांदे यांनी नांदगांव येथील शिवनेरी बंगल्यावरील पञकार परिषदेत दिला. नांदगांव तालुका दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन दि १८ रोजी नांदगांव येथील शिवनेरी रेस्ट हाऊसवर करण्यात आले होते. या प्रसंगी तालुका कार्यकारी दंडाधिकारी डाॅ सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी,तालुकाकृषी अधिकारी डमाळे आदीसह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या प्रसंगी नांदगांव तालुक्यातील पिक आनेवारी,पाऊस,व पेरणी या विषयावर सखोल माहिती देण्यात आली या वरुन नांदगांव तालुका दुष्काळाच्या क्राईट एरीयात बसतो आहे . नांदगांव तालुक्यात
८ महसूल मंडळात ५०% जास्त असेल तर सव्हे करावा लागतो , तालुक्यातील १०% उत्पादकता आढळली ति जिल्हाधिकारी यांना दिली आहे नांदगांव तालुक्यात .ॴॅगस्ट मध्ये सर्वात कमी पाऊस झाला .जुन ते सप्टेंबर मध्ये पाऊस कमी झाला तालुक्यतील जलसाठ्यात मृतसाठ्याहुन पाणी अधिक कमी झाले आहे .जलसाठ्यात पाणी नाही गावे वाडी वस्ती वर टँकरचे प्रमाण वाढत गेले टँकरशिवाय आता दुसरा पर्याय नाही. टँकर हा पाणी पुरवठ्याचा मुळ स्ञोत आहे .आपण शासनाला सर्व घटना क्रम दाखल केला तरी देखील नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर केला नाही तर आपण शासनाविरोधात कोर्टत रिपिटेशन दाखल करुन शिवाय वेळ पडल्यास आमदारकीच्या पदाचा राजीनामा देईल असे जाहीपणे आमदार कांदे यांनी आपली भुमिका व्यक्त केली. जिल्ह्यात पालक मंञी दादासाहेब भुसे व वरिष्ठ मंञी छगन भुजबळ यांना झुकता माप दिले गेले. त्यामुळे येवला,मालेगांव, सिन्नर हि तालुके दुष्काळाच्या पहल्या यादीत घेतली गेली आहेत दुसर्या यादीत नांदगांव तालुक्याचा समावेश होईल अशी आशा तालुका बाळगून आहे तसेच परतीचा पाऊस जर आला तर चारा पाण्याचा प्रश्न सुटेल?नांदगांव तालुका दुष्काळाच्या द्रुष्टीतुन पेरणी,प्लँनटेशन ट्रिगर वन मध्ये वसतो का ? तालुक्यातील
दोन पावसातील अंतर किती आहे .तालुक्यात सरासरी ६४:३ % पाऊस झालेला आहे .त्यामुळे झालेला पाऊस पेरणी होऊन पिकांच्या वाढीला पोषक ठरला नाही,त्यामुळे चार्यांची व पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे .तालुका दुष्काळजन्य परिस्थिती त असताना जर तालुक्याकडे राज्याच्या कृषीविभागाने नांदगांव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यास आपण न्यायालयात रिटपिटिशन दाखल करु वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देऊ असे स्पष्ट उत्तर आमदार सुहास कांदे यांनी पञकार परिषदेत दिले.


