मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी, श्रीवर्धन
श्रीवर्धन : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस अतिवृष्टी होत असून श्रीवर्धन तालुक्यालासुद्धा पावसाने झोडपून काढलं आहे.मुसळधार पावसामुळे शिस्ते-वडवली आणि कार्ले-दांडगुरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरची वहातूक बंद करण्यात आली आहे.गेले चार दिवस तालुक्यातील शाळा महाविद्यालयांनासुध्दा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भातशेतीच्या लावणीलासुद्धा या मुसळधार पावसाचा फटका बसला असून बहुतेक शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाचीसुद्धा चिंता वाढली आहे.दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे हे काळसुरी-तुरंबाडी या मार्गावरील खचलेल्या धोकादायक ठिकाणाच्या दुरुस्तीच्या कामावर जातीने लक्ष देत असून कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी भर पावसात आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानुसार तालुका प्रशासन सतर्क असून तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)