विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : भिगवण ते दौंड या रस्त्यावरून इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन या गावातून पुणे सोलापूर रेल्वे लाईन जाते. या ठिकाणी नियोजित रेल्वे उड्डाणपूल होणार असून याबाबत २०१४ सालापासून ग्रामपंचायत आणि रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये पत्र व्यवहार चालु आहेत. या ठिकाणी पूर्वी झालेल्या सर्वेनुसार रेल्वे उड्डाणपूल झाल्यास येथील जवळपास शंभर कुटुंबांची घरे पाडली जाणार आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचा या उड्डाणपुलाला विरोध असून रेल्वे उड्डाणपूला ऐवजी भुयारी मार्ग करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे तर काही ग्रामस्थांची इतर पर्यायी ठिकाणाहून उड्डाणपूल करण्याची मागणी आहे याबाबत काही दिवसापूर्वी मोजणी करण्यासाठी आलेल्या महारेल ( m r l d c) चे अधिकारी पंकज गुप्ते, शेखर भोसले, महेश ढेंमरे,हमीद शेख यांच्याशी ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली त्यानंतर उपस्थित अधिकारी यांनी ग्रामस्थाना तुमची मागणी आम्ही वरिष्ठांना कळवुन यावर निर्णय घेऊ असे सांगून तेथून निघून जाण्याची पसंत केले. त्यानंतर आज शनिवार दिनांक २३ जुलै रोजी रेल्वे भूसंपादनाचे उपसहमहाव्यवस्थापक सुनिल मराठे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून उड्डाणपूला ऐवजी भुयारी मार्ग करणे लोकहिताचे असल्याने तसेच उड्डाण पुलासाठी पर्यायी जागा असल्याचे निदर्शनास आणून दिले. या बैठकीनंतर बोलताना रेल्वे भूसंपादन विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुनील मराठे यांनी सांगितले की आम्ही ग्रामस्थांचे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सूचनेचे संबंधित वरिष्ठ विभागाशी चर्चा करून भुयारी मार्गासाठी स्वतंत्र सर्वे करून पुन्हा याबाबत बैठक लावून योग्य तो तातडीने निर्णय घेणार आहे.यावेळी भिगवणचे मा.सरपंच पराग जाधव, इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे तानाजी वायसे,शातीलाल रायसोनी, ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे, आबा काळे,बाळा भोसले, विठ्ठल मस्के, जावेद शेख, सुरेश बिंबे, मच्छिंद्र खडके, , प्रमोद कुलकर्णी,राकेश खटके, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.