रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा : जंगलातील लख्खामेढा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या सौंदर्याची सप्तसंगी रूपे घेऊन येत असतो.फुलांनी,हिरव्या झाडाझुडपांनी बहरलेल्या आणि महाभारत काळातील लक्षगृहाची साक्ष देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील लख्खामेढा पहाडावर आल्यावर आपसूकच निसर्गाशी नातं जुळतं.
जर तुम्हाला साहरी ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर लख्खामेढा पहाडी हे उत्तम पर्यटन स्थळ आहे.लख्खामेढा पहाडी वर जाण्याचा ट्रेकिंग हा एकमेव मार्ग आहे. जितके डोंगर पहाड उंच चढण्यास कठीण तितके मानवाचे प्रयत्न अधिक व उत्साह ही दांडगा दिसून येतो.लख्खामेढा हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर रेपनपल्ली गावापासून 4 किमी अंतरावर लक्षगृहासाठी प्रसिद्ध असलेले स्थळ आहे. घनदाट जंगलात हे लक्षगृह वसलेले होते.कथासंग्रहानुसार महाभारत काळात पांडवांनी लक्षगृहात आश्रय घेतला होता. जेव्हा कौरवांनी लक्षगृहामध्ये आश्रय घेतलेल्या पांडवांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कौरवांनी लक्षगृह जाळले.परंतु लक्षागृह हे नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्यामुळे ते बराच काळ जळत राहिले आणि पांडवांची एक गुप्त मार्ग वापरला जो तलावात उघडत होता.डोंगरमाथ्यावरील लक्षगृहाच्या विटा गुप्त मार्ग व तलाव आजही सत्याची साक्ष देत आहेत.लख्खामेढा येथे जाण्यासाठी ट्रेकिंग हा एकमेव मार्ग असल्याने येथे पहाटेच जावे लागते. लख्खामेढा येथील एक विशेष बाब म्हणजे या जंगलात आढळणाऱ्या वेली या उलट्या बाजूने वबलेल्या दिसतात. सामान्यता इतर ठिकाणी वेली या उजवीकडून डावीकडे वळलेल्या असतात पण या जंगलात आढळणाऱ्या वेली डावीकडून उजवीकडे वळणाऱ्या आहेत.निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला व महाभारत कालीन चमत्कारिक वारसा लाभलेला लख्खामेढा आजही दुर्लक्षित आहे.
विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या लख्खामेढा पर्यटन स्थळाचा शासनाने विकास केल्यास येथील स्थानिक लोकांना रोजगार व जिल्ह्याला नवे एडवेंचर्स ट्रेकिंग पॉईंट मिळेल.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)