मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: नांदेड जिल्ह्यातील युवकांमध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाने संबंध जिल्हयात तसेच नायगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे समुळ उच्चाटनासाठी कट कारस्थाने व पदाधिकारी कार्यकर्ते पद मिळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होत असलेल्या कुरापती कडे लक्ष न देता व कार्यकर्ते यांना नाउमेद न होऊ देता उत्स्फूर्तपणे पक्षाचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असते आसा दृढ विश्वास त्यांच्या मनात निर्माण करुन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या व आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिलं यामुळेच भास्कर पा.भिलवंडेंना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट )ग्रामीण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व एका सच्चा निष्ठावान तरुणांला “न्याय” मिळाला ” “देर आये मगर दुरुस्त आये” अशी चर्चा सर्वत्र आहे. त्याच बरोबर सर्वत्रच अभिनंदन होत आहे.भास्कर भिलवंडे यांच्या निवडीची वार्ता सर्वसामान्य लोकांना व युवकांना समजताच सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (शरद पवार गट) निश्चितच यश आणि पक्ष संघटनेस बळकटी मिळेल यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, कार्याध्यक्ष विक्रम नाग शेट्टीवार , नायगाव तालुका अध्यक्ष गजानन पवार, सरचिटणीस श्याम चोंडे, माधव कोरे यांची उपस्थिती होती.