विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, तालुक्यातील पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, या पावसाने शेतकऱ्यांचे फक्त पिकाचे नुकसानच नव्हे तर शेतकऱ्याचे तोंडी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे आधीच शासनाने बी बियाणे व खतावर औषधी वर वाढविलेल्या किमती मुळे शेतकरी परेशान झाला आहे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली पालकमंत्री यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाणी केली व शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, निल्लोड चे उपसरपंच अक्षय भैय्या मगर, शेतकरी गजानन मगर, कल्याण आहेर, दत्ता गोराडे आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,