संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-विद्यमान आ. डॉ.संदीप धुर्वे यांनी आर्णी-केळापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असताना विविध योजनेमधून मतदार संघात विकासात्मक कामे भरपूर प्रमाणात आणली परंतु त्या कामाचा त्यांनी गाजावाजा कधीच केला नाही हे विशेष घाटंजी शहरासाठी वाघाडी धरणातून ते थेट घाटंजीपर्यंत शहरासाठी ५० कोटीची पाणीपुरवठा योजना खेचून आणली व शहराला पाणीटंचाईपासून कायमची मुक्तता मिळवून दिली तर खेडेगावात तालुक्यातील १०७ गावांपैकी जवळपास ९८ गावांमध्ये पन्नास कोटी २५ लाखांची जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीपासून तर पाण्याची टाकी ते घरापर्यंत नळांची योजना अमलात हर घर जल ची पूर्तता करण्यात यशस्वीता मिळविली मतदारसंघातील प्रत्येक गावाला आपल्या आमदार निधीतून २५-१५ चा निधी तसेच खनिकर्म दलित वस्ती तांडा वस्ती अशा विविध योजनेमधून मतदारसंघातील प्रत्येक गावाला काही ना काही निधी देण्यात आला आत्ता नुकत्याच शेतकरी वर्गाला गतवर्षीच्या सोयाबीन व कापूस या पिकाच्या भाव फरकात हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टर ची ठेवण्यात आली आणि आज रोजी त्यांच्या अंमलबजावणीची सुरुवात देखील झाली ही त्यांच्या कामाचीच पावती होय मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असल्याने आजपर्यंत सर्वच आमदार हे आदिवासी झाले परंतु आदिवासी बेरोजगार युवकांसाठी कोणी सरसावले नाही तर नुकतेच आदिवासी बेरोजगार १२५०० युवकांना सरळ सेवा भरतीची वाट मोकळी करून दिली.खरोखरच हे प्रशंसनीय कार्य आ. संदीप धुर्वे यांनी केले आ.संदीप धुर्वे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी विकास कामांना महत्त्व देतो विकास कामे खेचून आणतो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतो त्यांचा विकास कसा करता येईल हे शोधत असतो आणि मी ते कार्य पूर्णत्वास नेतो परंतु कधीही गाजावाजा केला नाही कारण मला गाजावाजा पसंत नसून विकासात्मक धोरण पसंद आहे.