मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी :- मूल -चामोर्शी अर्धवट रस्ता काय ठिकाणी मोठे मोठे खड्डे झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात या खड्ड्यांना चिकल्टी मारण्याची स्वरूप आलेले आहे. खड्यामुळे धोकादायक प्रवास सुरू असून बांधकाम विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर अनेक गावे येतात मूल चामोर्शी शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी दररोज ये – जा करतात विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे एवढेच नव्हे तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यात देखील याच रस्त्याचे ये जा करतात मागील एक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्ड्यांना चिखलाठी मारण्याची वेळ निर्माण झाली आहे. रस्त्याने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे सदर रस्त्यावर टू व्हीलर चालवणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक धोकादायक प्रवास करीत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणी सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात प्रति रोष व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घ्यावे अशी मागणी युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष ओबीसी महासंघाचे जिल्हा युवा कोषाध्यक्ष राहुल वैरागडे व परिसरातील नागरिक करीत आहे.