स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : पुरस्कार हा समाजमनाचा आरसा असतो. समाजात राहून समाजातील विविध घटकांसाठी काही माणसे डोंगराएवढे कार्य करतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना पुन्हा काम करण्याची नवऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरस्कार हे योग्य माध्यम ठरते. नुकतीच सरपंचपदाची माळ गळ्यात पडलेले कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना लोकमत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंचपदाची सूत्रे हातात घेताच या ध्येयवेड्या सरपंचांने गावात वेगवेगळ्या योजना राबवून गावच्या विकासाची वेगाने वाटचाल सुरु केली. सर्वप्रथम त्यांनी अपंगाच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारून जिल्यात आदर्श निर्माण केला,गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची वाणवा असतानाही १०० टक्के जनावरांचे लसीकरण करून घेतले.दोन महिन्यात करियर मार्गदर्शन,मेडिटेशन, लाडकी बहीण योजना,शेतकरी मार्गदर्शन मेळावा यांसारख्या योजना राबवत गावचा सरपंच कसा असावा याचा आदर्श समाजापुढे ठेवला. याचेच द्योतक म्हणून लोकमतने त्यांना ‘लोकमत अचिव्हर्स ‘पुरस्काराने आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले. भविष्यात गावच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह वैचारीक क्षेत्रात कोरेगाव भिमा गावची वेगळी ओळख आहे. ती सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.गावातील प्रमुख प्रश्न सोडवून गावच्या विकासावर भर देणार असून महिलांसाठी शासकीय योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.