प्रशांत सूर्यवंशी तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा- राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून राज्य मंत्रिमंडळात विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे.तसेच महत्वपूर्ण ठराव देखील या अधिवेशनात मांडले जात असून मान्य देखील केले जात आहे.राज्य सरकारने नुकताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच अधिवेशनात मंजूर केली पण त्यात बऱ्याच अटी व शर्ती होत्या.त्यामुळे बऱ्याच बहिणी या योजनेपासून लांबच राहणार होत्या. या जाचक अटी व शर्थीचा अभ्यास करून लागलीच शहादा तळोदा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री महोदयाना विनंती करून यातील काही जाचक अटी व शर्थीपासून क्षितीलता मिळण्यासाठी विनंती केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेतून उत्पन्न दाखला व रहिवास दाखल्यातून अनेक महिलांना मुक्ती मिळाली.यामुळे अनेक बहिणींना याचा फायदा होताना दिसून येत आहे. यातच भर म्हणून काल विधानसभेच्या अधिवेशनात आमदार राजेश पाडवी यांनी शहादा तळोदा मतदार संघातील सर्वात ज्वलंत प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून घेतली.नंदुरबार जिल्ह्यातून विशेषतः शहादा तळोदा मतदार संघातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असते.हेच स्थलांतर रोखण्यासाठी व जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी आमदार महोदयांनी एमआयडीसीची व उद्योगधंदे उभारणीची मागणी विधानसभेच्या अधिवेशनात केली.या मागणीला उत्तर देताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढील काळात नंदुरबार जिल्ह्यात २००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचा उल्लेख केला.तसेच सध्या ५०० कोटींचे कामे सुरू असून लवकरच गुजरात मधील सुरत येथील टेक्सटाईल कंपन्याना नंदुरबार जिल्ह्यात आणून स्थलांतराचा प्रश्नवर मार्ग निघेल व नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असे देखील म्हणाले.आजपर्यंत शहादा तळोदा मतदार संघाच्या विकासासाठी आमदार राजेश पाडवी यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला असून त्याप्रमाणे विकास होताना दिसून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात शहादा तळोदा मतदार संघाचा विकासासाठी आमदार राजेश पाडवी चांगलीच बॅटिंग करत आहे अशी चर्चा जनमानसात होताना दिसून येत आहे.