सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
भारतीय कृषी कृषी अनुसंधान परिषद अटारी पुणे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ शाकीर अली यांची निकरा व्हिलेज कात्री गावात भेट शेतकऱ्यांनी हवामान बदलास सोमर जाताना हवामानानुकुल योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आपल्या शेतात आपल्या परीसरात होणाऱ्या उत्पादनाच्या आधारावर विविध प्रकारचे उद्योग उभे करून शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य कृषी विज्ञान केंद्र करेल. उतपादन ते निर्यातीपर्यंत नियोजन करण्यासाठी सुर्यदर्शन शेतकरी उत्पादन कंपनी मोलाची ठरेल. पर्जन्य मापकादवारे पाऊस मोजण्याची निरंतर गाव स्तरीय व्यवस्था हीच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नियोजनातील महत्व सांगणारी अत्यंत अधोरेखीत करणारी बाब असेल याची कात्री गावात सुरुवात होत असुन यासाठी स्वयं प्रेरणेने जलदुत यांची नोंद घेतील. या पावसांच्या नोंदी आगामी काळातील नियोजनासाठी महत्वाचे ठरणार आहे असे प्रतिपादन डॉ शाकीर अली यांनी यावेळी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने सुदर्शन शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य, महिला भगिनी आणि भुजगाव परीसरातील निकरा प्रयोगातील शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती या शेतकरी मेळाव्याचे प्रस्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियांत्रिकी तज्ञ जयंत उत्तरराव यांनी केले.याप्रसगी बोलताना कृषी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी धडगाव तसेच कात्री परीसरात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून झाले चालू असलेल्या हे काय शेती आणि पशुधना संदर्भातील वेगवेगळ्या प्रयोगाची मांडणी करून महु, सिताफळ प्रकिया संदर्भात सुरू असलेलें प्रयत्नांची माहिती दिली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयोगात बदल कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी विवेचन केले सूर्यदर्शन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून कात्री परिसरात झालेल्या मर्द व जलसंवर्धन वृक्ष लागवड सारा लागवड याबाबत कात्री गावाचे लोकनियुक्त सरपंच संदीप वळवी अनुभव व्यक्त केला धडगांव परिसरातील उद्योजिका सौ. सुनंदाताई पाडवी यांनी महु लाडू निर्मिती आणि विक्री व्यवस्थापनाबाबत अनुभवाशी देवाण-घेवाण केली पर्जन्यमानाच्या नोंदीचे महत्व कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी उपस्थितांना समजावून सांगितले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयोगातील बुजगाव येथील वसंत पावरा, रमेश पावरा यांनी आपले अनुभव व्यक्त केले तसेच गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)