कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद .अखिल भारतीय बंजारा युवा सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जिणकर सुदाम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दि. २३ जून रोजी निवेदन पाठवून त्या निवेदनात ते म्हणतात की, वारंवार अर्ज विनंती करून, पायदळ यात्रा करूनही बंजारा व विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समस्या सुटत नसल्यामुळे दि. २३ जून पासून राज्याचे माजी मुख्यमंत्री बंजारा समाजाचे दैवत कै. वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषणास बसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वरील निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत.प्रामुख्याने बंजारा समाजाला तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनु जमाती प्रवर्गामध्ये एसटी आरक्षण लागू करावे, विमुक्त जाती प्रवर्गात सुरू असलेले बोगस राजपूत भामटा घुसखोरी रोखण्यासाठी एस आय टी करण्यात यावी. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला १५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी, नॉन क्रिमिलियर ची अट कायमस्वरूपी रद्द करावी, गोर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या कालावधीत गोर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ रद्द करावे, प्रत्येक तांड्यात घरकुल योजना राबवून प्रत्येकाला घरकुल उभे करून द्यावे यासह इत्यादी मागण्या त्यांनी केल्या आहेत. जो पर्यंत शासन मागण्या पूर्ण करणार नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार उपोषणकर्ते जिनकर सुदाम राठोड यांना जाहीर पाठिंबा गोरसेना यांनी दिला आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)