शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू तालुक्या तील लोअर दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्या साठी प्रकल्प प्रशासनाने आज दिनांक 22 मे बुधवार रोजी सकाळी संपूर्ण तयारी केली होती. नदी काठावरील नागरिकां ना सतर्कतेचा इशारा देत सकाळी,१० वाजता नदीपात्रात पाणी सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र प्रकल्पग्रस्त शेकडो शेतकरी यांनी प्रत्यक्ष धरण क्षेत्र परिसरात येऊन, नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केल्यामुळे,प्रशासनला धरणाचे दरवाजे तब्बल साडेपाच घंटे उशीराने म्हणजे दुपारी ०३ वाजून ३० मिनीटांनी उघडता आले. प्रशासन व बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे, सेलू तालुक्यात पाणी पेटला असेच म्हणावे लागेल. सेलू तालुक्या तील लोअर दुधना प्रकल्पात मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आज बुधवार रोजी जलाशयात जिवंत पाणीसाठा ०.११ टक्के म्हणजेच शून्य टक्के इतकाच आहे .मागील वर्षी आजच्या दिवशी जिवंत साठा ३५ टक्के इतका होता. म्हणजेच आज प्रकल्पात जिवंत पाणी साठा शून्य टक्के इतका असताना, मृत साठ्यातून नदीपात्रात धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडून नदीपात्रात एकूण ५३४६ क्युसेस पानी सोडण्यात आला आहे . मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असावी.नदीपात्रातील पाणी पातळी वाढवून होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने दुधना काठा वरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. असे असताना प्रत्यक्ष धरण परिसरात प्रकल्पग्रस्त शेकडो शेतकरी यांनी येऊन प्रशासनाला नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केला .यावेळी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले , मात्र तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना दूपारी उशीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती लोअर दुधना धरण प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. लोअर दुधना प्रकल्पातील जल साठ्यातून जालना जिल्ह्यातील परतुर,मंठा व परभणी जिल्ह्यातील सेलू अशा तीन मोठ्या शहरासह परतुर तालुक्यातील शेकडो गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येते. मात्र मृतसाठ्यातून,नदीपात्रात पाणी सोडल्या नंतर या गावाचा पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो .दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील दुधना काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे. नदीपात्रात पाणी सोडून परभणी जिल्ह्यातील दुधना नदीकाठावरील सर्व गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने लोअर दुधना प्रकल्पातून पाणी नदीपात्रात सोडण्या साठी आदेश निर्गमित करण्यात आले होते . त्यामुळे दुधना काठा वरील गावांना निश्चित दिलासा मिळणार असून ,काठावरील गावातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी प्रश्न तसेच गुराढोरांचा पिण्याच्या पाणी प्रश्न यामुळे काही प्रमाणात सुटेल .तर दुसरीकडे नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे लोअर दुधना प्रकल्पातून उपसा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारे पाणी आणिप्रकल्पावर अवलंबून सर्व पाणीपुरवठा योजना यासाठी अडचणी निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भविष्यात गंभीर होऊ शकतील यावेळी लोअर दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धुळगुंडे, उप अभियंता बाबासाहेब मार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, तहसीलदार दिनेश झांपले आदी सह मोठा पोलीस बंदोबस्त, घटना स्थळी उपस्थित होता.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)