पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक
८ मे पासून हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात पाऊस,वादळवारा,गारपीट व मेघगर्जनासह कडकडाट होण्याचा अंदाज वर्तविला होता.यातच या कालावधीत वादळी वारा व पावसाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच दि.९ मे रोजी ९.३० ला आलेल्या वादळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने गावकऱ्याची एकच तारांबळ उडाली.माहितीनुसार,रामटेक तालुक्यातील मरारवाडी गावातील हरभजन मुंसी बाहे वय ४७ यांचा मरारवाडी येथे छोटेशे घर आहे.अचानक ९.३० वाजताच्या सुमारास आलेल्या मुसडधार वादळी पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरले.एकाएकी आलेल्या पावसाने घरातील व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घरात पूर्णपणे पाणी शिरल्याने घरमालकालाच स्वतःच्या हाताने घरात शिरलेले पाणी बादलीच्या मदतीने बाहेर काढले.