विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई :मुंबईचे प्रवेशव्दार संबोधले जाणाऱ्या चेंबूर येथील एन जी आचार्य उद्यान अर्थात डायमंड गार्डन येथे चेंबूरकरांना शासकीय नियमाप्रमाणे मनोरंजनासाठी कैक वर्षांपासून प्रवेशासाठी खुले करण्यात आले.
मात्र आत्ता सदर उद्यान हे सुशोभीकरणाच्या नावाखाली काही दिवसांपासून बंद असल्यामुळे चेंबूरमधील जागरूक रहिवाश्यांनी या विरोधात आज भल्या पहाटे प्रशासनाला जागे करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. या स्वाक्षरी मोहिमेद्वारे त्यांना प्रशासनाला कळवायचे आहे की डायमंड उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा हक्क व त्यांना सुविधा देण्यापासून वंचित करणे हे योग्य नाही. म्हणून सदर उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली जे बंद करण्यात आले आहे ते विनाविलंब सुरू करण्यात यावे तसेच उद्यानामध्ये क्राँकटीकरण करण्याचे काम सुरू आहे ते सुद्धा त्वरीत बंद करावे आदी मागण्यांकरिता आज एन जी आचार्य उद्यान /डायमंड गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ स्वाक्षरी मोहीम करण्यात आली. या वेळेला भल्या पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी यावेळी उद्यान लवकरात लवकर सुरू करावे अश्या चेंबूरच्या रहिवाश्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.