अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव: वाशिम जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी पूर्वी पासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कास धरली त्यात प्रमुख मागणी म्हणजे अग्रीम २५ टक्के विमा रक्कम ही सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागणी होती आणि या मागणीला यश सुद्धा आले त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी श्रीयाचे घोडे नाचवत आमच्यामुळ आले अशी संकल्पना धरली मात्र आज मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कुठल्याही गाव खेड्यातगेल्यास त्याचा वास्तविक प्रमुख आणि वास्तव्य श्रेयहे स्वाभिमानीला जाते स्वाभिमानीच्याच पुढाकाराने रिसोड मालेगाव आधी शेतकऱ्यांना आग्ररीम २५ टक्के शासनाच्या माध्यमातून जाहीर झाली आणि ती खात्यामध्ये जमा करण्यासाठी लवकरच स्वाभिमानी एल्गार मोर्चा काढणार आज मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे सोयाबीन एल्गार मेळाव्याला उपस्थिती दर्शविली असताना त्यामध्ये पूर्वीचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळावा यासाठी २०१३ साली दिंडी काढली होती, आता दहा वर्षानंतर ते स्वतः कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. नुकताच त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून.त्यांनी आता सोयाबीनला आठ हजार रुपये देण्यासाठी सरकारला भाग पडावे अन्यथा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या घरावर सोयाबीन दिंडी काढतील असा इशारा मालेगाव सोयाबीन परिषदेतून स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी दिला आहे. सोयाबीच्या दरासोबतच कपाशीला१२ हजार रुपये दर देण्यात यावा, पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, तसेच यावर्षी बऱ्याच प्रमाणात पाण्याच्या पातळीने तळ घातला असताना खरीप गेले आणि रब्बीतही अशा मंदावल्या असताना त्यात पेरलेल्या पिकांना वन्यप्राण्यांचाहौदास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या या संबंधित विभागाने तथा शासनाने बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मोबदल्याची तात्काळ रक्कम तत्काळ प्रोसिजर जमा करावी अशा पद्धतीच्या मागण्या सोयाबीन परिषदेतून करण्यात आल्या. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर लाल्या या बिमारीने थैमान घातले आहे तसेच आत्ताच काही दिवसापूर्वी ऐकले असताना पांगरी नवघरे. पांगरा बंदी या परिसरातील कपाशी या पिकाचे रानडुकराने जमीनदोस्त केल्या या संबंधिताचा सर्वच आढावा घेऊन तत्काळ मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी रिसोड मालेगाव परिसरामध्ये स्वाभिमानीच पर्याय शेतकऱ्यांना उरली असल्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे पंचक्रोशीत बऱ्याच प्रमाणात शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अधिक प्राधान्य देत असताना शेतकऱ्यांच्या हक्काची बाजू मांडणारा एकमेव संघटना म्हणून स्वाभिमानीला बघितले जाते या परिषदेला राजू शेट्टी यांनी ऑनलाईन उपस्थित राहत मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव झालेल्या कपाशीचे नुकसान जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा सुरूच ठेवणार हसण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.