प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी, अक्कलकुवा
अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील खाई ग्रामपंचायत अंतर्गत ईराईबारीपाडा येथील शिवारात तीन मोरबट्टीच्या गंजीला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याने मोरबट्टी पिकासह चारा जळून खाक झाला आहे. ही घटना बुधवारी दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहेत.खाई गावालगत ईराईबारीपाडा येथिल शिवारात शेतकऱ्यांनी डोंगर,दरीखोऱ्यातुन गोळा केलेले वर्ष भराची कमाई काढण्यासाठी अथक मेहनत घेतली होती.डोंगराळ भागातील शेतातुन कालुसिंग उतऱ्या वसावे,विजा मारग्या वसावे,जोल्या राश्या वसावे या तिन्ही शेतकऱ्यांनी एका ठिकाणी तीन वेगवेगळे गंजी गोळा करुन ठेवल्या होत्या. गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. डोंगराळ भाग व सकाळी ची वेळ असल्यामुळे शेतकरी बेसावध असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याने खाई येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एन दिवाळीत हाताशी आलेले वर्ष भराच्या कामाईच्या धान्य व चारासह जळून खाक झाले यात शेतकऱ्यांचे जवळपास ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे.खाई गावातील तिन्ही शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसंच, उभ्या शेतातील पिक जळल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. या तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने संबंधित घटनेचा पंचनामा होणे आवश्यक होते. मात्र तलाठी यांना याबाबत कल्पना देखील घटनास्थळी भेट दिली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने झालेल्या नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अक्कलकुवा, धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी केली आहेत.